जयशंकर यांच्याशी चर्चा केल्यावर मुनीर यांना फोन   

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा तणाव कमी करण्यात हात

वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी प्रथम भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशी देखील चर्चा केली. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव निवळण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे 
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक करावाई करुन पाकिस्तानचे दहशतवादी तळ नष्ट केले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सीमेवर सुरूच होत्या.कधी क्षेपणास्त्र तर कधी ड्रोन हल्ले त्याने केले. यानंतर भारत अधिक आक्रमक कारवाइर्ं करण्याची तयारी सुरु केली. ती पाहून  अमेरिकेसह जग चिंतेत पडले होते. युद्ध भडकेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. पाकिस्तान देखील भारताच्या हल्ल्यानंतर घाबरून गेला होता. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला रोखावे, यासाठी तो धडपडत  होता. या घडमोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी दोन्ही देशांत शांतता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे मानले जात आहे. त्यांनी प्रथम जयशंकर आणि नंतर मुनीर यांच्याशी चर्चा केली. रुबियो यांनी तणाव कमी करण्याची आणि थेट संवादाला चालना देण्याची गरजेवर भर दिला. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या की, संघर्ष टाळावा आणि चर्चा सुरू व्हावी, यासाठी रुबियो यांनी पुढाकार घेतला. थेट चचार्ं करण्याचा आग्रह 
 
भारत आणि पाकिस्तानने थेट चर्चा करावी, असा आग्रह अमेरिकेने धरला. भविष्यातील वाद टाळण्यासाठी चर्चा व्हावी, यासाठी अमेरिका मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी देखील चर्चा केली. रुबियो यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत. चुका टाळून थेट संवादावर भर दिला पाहिजे. भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी रचनात्मक वाटाघाटी सुरू करण्यासाठी अमेरिका मदत करण्यास तयार आहे.

Related Articles